*नमुंमपा क्षेत्रातील शाळांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी स्मरण करीत ‘विद्यार्थी दिन’ साजरा* *‘वंदे मातरम’ गीताच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त शाळांमध्ये समुहगान संपन्न*
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचे स्मरण करीत 7 नोव्हेंबर रोजी राज्यभरात विद्यार्थी दिन साजरा करण्यात येतो. या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेऊन शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवत अत्यंत उत्साहाने विद्यार्थी दिवस साजरा केला जातो.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही विद्यार्थी दिवस नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व खाजगी सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही प्रभावी प्रसंगांविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती करून दिली याप्रसंगी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील जीवनपटही प्रोजेक्टरच्या माध्यमातून शाळांमध्ये दाखविण्यात आला तसेच त्यांच्या कार्याची माहिती व महती सांगण्यात आली.
प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे भविष्य आहे याकरिता विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये सतत ज्ञान प्राप्त करीत रहावे व त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःची व देशाची प्रगती करण्यासाठी करावा याबाबत शिक्षकांच्या माध्यमातून व तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. काही शाळांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते तसेच पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले होते. काही शाळांमध्ये काव्यवाचन स्पर्धा तसेच वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात आल्या. शासन परिपत्रकानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
त्याचप्रमाणे बकीमचंद्र चटोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली असून केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार वंदे मातरम गीत सामूहिक रितीने गाण्याचा उपक्रमही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविला गेला. यात अनेक ठिकाणई शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकही सहभागी झाले. काही ठिकाणी देशाभिमान प्रदर्शित करीत नागरिकांनीही यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या अनुषंगाने प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत व्हावा तसेच त्यांना देशभक्तीची जाणीव व्हावी याकरिता शाळा-महाविद्यालय स्तरावर देशभक्तीपर भाषणे तसेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या शूरवीरांनी बलिदान दिले त्यांच्याबद्दल प्रदर्शन आणि भाषण अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय गीत गायनाने देशाबद्दल असलेल्या अभिमानाची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. काही शाळांमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान देणाऱ्या शूरवीरांविषयी माहितीप्रद प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासातील घटनांची माहिती देत व वंदे मातरम गीताचे समुहगान करीत नवी मुंबईतील शाळांमध्ये वंदे मातरम सामूहिक गीत गायन हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
Tejal KhanvilkarWith an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.