"वादळी वाऱ्याने पत्रे उडून भिंत कोसळली; सहा जणांचा मृत्यू"
- by
- May 13, 2026
सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात धक्कादायक घटना धड़ली आहे. मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. वादळी वारा आणि पावसाने एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जत मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेनं सांगली जिल्ह्यावर शोककला पसरली आहे.
मृतांची नावे
- शंकर आबा लोखंडे पाडोझरी
- मंगल भाऊसा मोठे पांडोजरी
- संजुबाई राम चौधरी पांडोजरी
- कोंडीबा गेजगे दरीबडची
- तर आणखी दोन भविकांचा मृत्यू झाला आहे, असे एकूण सहा भविकांचा मृत्यू झाल्याची माहीती मिळत आहे. अनेक भाविक जखमी झाले आहेत .
वाऱ्याच्या तडाख्याने भिंत कोसळली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील मोटेवाडी ये मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती. भाविकांची मोठी गर्दी होती वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे भाविकांनी शेडच्या भिंतीला आडोसा म्हणून आसरा घेतला पण भिंत चिऱ्याच्या दगडाच्या बांधकामाची होती. चिऱ्याच्या तडाख्यान भिंत कोसळली त्यामध्ये भाविकांचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी, इतर १५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जत प्रशासन व पोलिसांची तातडीने धाव घेतली असून त प्रांताधिकारी नष्ठे यांची घटनास्थळी भेट, जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले आहे. मृतांपैकी तीन जण विजापूर तालुक्यातील व तीन जण जत तालुक्यातील आहेत.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times