दिल्लीतील अमृतवाटिकेत ठाण्यातील माती जाणे हे अभिमानास्पद - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
ठाणे :- देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभर सुरू असलेल्या ‘माझी माती माझा देश’ (मेरी माटी मेरा देश) उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील नगरपरिषदांमधून गोळा केलेल्या मातीचे एका अमृत कलशामध्ये एकत्रिकरणाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात व वीरश्रीयुक्त वातावरणात पार पडला.
ठाण्यातील मातीचा सुगंध राजधानी दिल्लीतील अमृतवाटिकेत बहरणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे आपण भाग आहोत, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हयातील नगरपरिषदांमधून आलेली माती एका अमृत कलशामध्ये एकत्रित करण्यात आली. या कलशातील मातीचे जिल्हाधिकाऱ्यांनी पूजन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, ठाणे महागरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ठाणे महानगरपालिका उपायुक्त जी. व्ही. गोदेपुरे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, भिवंडी महानगरपालिका उपायुक्त सचिन माने, अंबरनाथचे नेहरु युवा केंद्राचे समन्वयक निशांत रौतेला, अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अंबरनाथ अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक . पराडकर, कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्याधिकारी योगेश गोडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा अधिकारी अभिलाषा राहूल पाटील, उल्हासनगर महापालिकेच्या सचिव प्राजक्ता कुलकर्णी, श्रध्दा बाविस्कर यांच्यासह स्वंयसेवक उपस्थित होते.
‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातून सहा महापालिकांचे प्रत्येकी एक याप्रमाणे सहा, नगरपरिषदा व नगरपंचायतींचा एक, जिल्हा परिषदेच्या पाचही पंचायत समितीचे प्रत्येकी एक याप्रमाणे पाच अमृत कलश मुंबई येथील राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी येत्या दि.26 ऑक्टोबर 2023 रोजी रवाना होणार आहेत. त्यानंतर हे कलश दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीत दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या देशस्तरीय कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. या कलशाबरोबर एक समन्वयक व 24 स्वयंसेवक ठाणे जिल्ह्यातून जाणार आहेत.
जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील माती व तांदूळ असलेला कलश दिल्ली येथील अमृत वाटिकेत जाणार आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील माती ही एक वेगळीच माती असून या मातीला वीरांची परंपरा लाभली आहे. गेली 75 वर्षे आपल्या देशात लोकशाहीची जपवणूक करत आहोत. “माझी माती माझा देश” या उपक्रमातून जगाला आपल्या समृद्ध लोकशाहीचा व संदेश पोहोचविला जाणार आहे. यापुढील काळातही आपली लोकशाही जपणार आहोत. जिल्ह्यात हा उपक्रम देशभक्ती व समर्पण भावनेतून यशस्वी करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपजिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांनी “माझी माती माझा देश” उपक्रमाची व जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी पंचप्रण शपथही घेण्यात आली.
चिमुकल्या बहिणींचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले विशेष कौतुक
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन करून सुरूवात केली. यावेळी महेंद्र वानखेडे यांनी वीरश्रीयुक्त पोवाडा सादर केला.
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थिंनी किंजल महेश जाधव व क्रिषा महेश जाधव यांनी सुरेल आवाजात “ऐ वतन ऐ वतन” हे देशभक्तीपर गीत सादर केले. या चिमुकल्यांचे हे गीत ऐकून जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी या दोघींना आपल्या शेजारी खुर्चीवर बसवून त्यांचे कौतुक केले.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times